रामजन्म भूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट “मिशन अयोध्या”२४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला …
स्टार कलाकार ऐवजी नवोदित कलाकारांना चित्रपटात काम करण्याची मिळाली सुवर्णसंधी...

अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि निर्माति कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या 24 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून होणार आहे. या चित्रपटाची माहिती देण्यासाठी आज खास या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि चित्रपटील व्यक्तिरेखा कारसेवक विचारे हे आपल्या सिद्धेश्वर नगरीत आयोजित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.
दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे हे ‘मिशन अयोध्या’ च्या चित्रीकरणाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले, “अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे, तर संपूर्ण युनिटसाठी एक अभूतपूर्व अनुभव ठरला. विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करत, त्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता. मंदिराच्या भव्य वास्तुशिल्पाचा प्रत्येक कोपरा, वातावरणातील अलौकिक शांतता, आणि रामनामाचा गजर आमच्या हृदयाला स्पर्शन गेला. ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट केवळ एक कथा सांगणारा नाही, तर प्रभू श्रीरामांच्या अनंत भक्तीसाठी समर्पित एक आध्यात्मिक प्रवास आहे. मला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या चरणांशी आत्मीयतेने जोडेल आणि त्यांच्या जीवनात सकारात्मकता निर्माण करेल.”
निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि सौ. योगिता कृष्णा शिंदे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाले ‘मिशन अयोध्या’ हा केवळ चित्रपट नसून रामभक्तांसाठी एक आध्यात्मिक उत्सव आहे. अयोध्येच्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना तिथल्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला प्रेरणा दिली. आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत निरंतर तेवत ठेवून प्रभू श्रीरामांबद्दलची आस्था अधिक दृढ करेल.”
दिग्दर्शकाचे मनोगत
प्रत्येक चित्रपट दिग्दर्शित करीत असताना मी त्या विषयाशी प्रामाणिक राहून त्या गोष्टीला न्याय देण्याचा दिग्दर्शक म्हणून नेहमी प्रयत्न करतो. अशावेळी जेव्हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय त्या चित्रपटाच्या गोष्टीशी निगडित असतो तेव्हा मी त्या चित्रपटाशी भावनिक पातळीवर जोडला जातो. आणि तो चित्रपट माझ्यासाठी खास बनतो. असंच काहीसं या ” मिशन अयोध्या चित्रपटाबद्दल माझ्यासोबत घडले आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा बाबरी मस्जिद जमीन दोस्त झाली. भारताच्या इतिहासातील ती एक अभूतपूर्व घटना होती. त्या घटनेच्या परिणाम सर्व देशवासीयांच्या मनावर झाला त्याला मी सुद्धा अपवाद नव्हतो. एका मोठ्या न्यायालयीन संघर्षानंतर रामजन्मभूमी मंदिराला परवानगी मिळाली आणि अयोध्ये मध्ये भव्य राममंदिर उभं राहिलं. पण त्यामुळे भारतीय राजकारणाला मिळालेल्या दिशेशी माझं मन संतुष्ट नव्हतं आणि पुढच्या पिढ्यांचा जेव्हा मी विचार करू लागलो तेव्हा मानसिक त्रास होऊ लागला आणि मनात निर्माण आलेली विचारांची घुसमट असह्य होऊ लागली. म्हणूनच प्रभू श्रीरामांनी घुसमट बाहेर व्यक्त करण्यासाठी “मिशन अयोध्या” चित्रपटाची योजना केली असावी असं मला वाटतं. माझ्या निर्मात्यांनी या मिशनला सिनेमाच्या रूपात सत्यात उतरवण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
” मिशन अयोध्या ” हा एक चित्रपट नसून एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो प्रत्येक राम भक्ताला, देशवासीयांना आपल्या सोबत पुढे नेणारा आहे. हे ” मिशन” प्रभू श्रीरामाच्या हृदयाशी प्रत्येकाला जोडणारा आहे तोडणारे नव्हे
चित्रपटाविषयी ……(synopsis)
मिशन सैनिकांचे असते, मिशन अतिरेक्यांचे असते. मग मिशन एका शिक्षकाचं का नसावं ? असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हा इतिहास विषयच शिक्षक असूनही छत्रपती शिवका महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित करायचे ठरवले आहे. ज्याचं नाव आहे “मिशन अयोध्या
उच्चधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये सरते शेवटी श्री राम जन्मभूमी मंदिर साधारण मात्र त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होता रामजन्मभूमि मंदिर उभारलं गेलं, पण पुढे काजा सभी मंदिर पण श्रीरामाच्या विचारांचं काय ? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतः आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते कारणले याति शिवाजी महाराज, संभावना से बेचैन होतात आदर्श मानतात त्या आदशांचा आदर्श श्रीराम आहे आणि निर्माण झालेले भजन मंदिर संभाजी महाराजांना आपला आदर्श याच्या पिट्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास कोणाच्या कला हवा. श्रीराम हा संपूर्ण पिची साल असायला हवी, पहा धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा विचार सदेवाचा तिरस्काराचा विवर्ण विश्वाचा आहे त्याला स्वीकारायला हवं असं त्यांचं आदर्श चरित्र आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणं, तो पुढच्या पिढ्यात रुजवणे आणि रामराज्याकडे वाटचाल करणे हेच मिशन अयोध्या आहे…