maharashtrapoliticalsocialsolapur

इतिहासात प्रथमच‎ रामवाडीत‎ श्री‎ गजानन महाराजांच्या‎ पालखीचे आगमन; ‘ईच्छा भगवंताची परिवारा’कडून‎ भक्तिभावाने‎ भव्य‎ स्वागत

संतश्रेष्ठ गजानन‎ महाराज पालखी आगमन‎ सोहळा तसेच महाराष्ट्र राज्याचे‎ लाडके‎ मुख्यमंत्री देवाभाऊंच्या‎ वाढदिवसाचे‎ औचित्य‎ साधून‎ वारकरी‎ संप्रदायातील‎ भक्तगणांसाठी राजगिरा‎ लाडू‎ चे वाटप

 

 

सोलापूर

‎ आषाढी‎ वारीच्या‎ पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्र‎ शेगावचा‎ राणा, संतश्रेष्ठ श्री‎ गजानन महाराजांच्या पालखीचे‎ इतिहासात प्रथमच‎ रामवाडी परिसरात आगमन‎ झाल्याने‎ संपूर्ण परिसर भक्ती,‎ श्रद्धा‎ आणि हरिनामाच्या गजराने‎ दुमदुमून‎ गेला. रेल्वे‎ पुलाच्या‎ कामामुळे‎ यंदा‎ पालखीचा मार्ग बदलल्याने‎ प्रथमच रामवाडीतील वारकरी भक्तांना महाराजांच्या‎ पालखीचे‎ दर्शन घेण्याचा योग लाभला.‎ टाळ-मृदुंगाचा निनाद,‎ “गण‎ गण‎ गणात बोते”चा जयघोष आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात भाविकांनी महाराजांच्या‎ पालखीचे‎ दर्शन‎ घेत भक्तिसागरात तल्लीन‎ होत आध्यात्मिक‎ आनंद अनुभवला ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने गुलाब‎ पुष्पांची‎ भव्य‎ पुष्पवृष्टी करून‎ पालखीचे‎ स्वागत करण्यात आले. तसेच‎ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस‎ यांच्या वाढदिवसाचे औचित्य‎ साधून वारकरी संप्रदायातील‎ भाविकांना‎ राजगिरा‎ लाडू‎ प्रसादाचे वाटप करण्यात‎ आले.‎

 

 

यावेळी‎ उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी‎ देवकर,‎ ईच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव,‎ श्री सद्गुरू‎ बसवारुढ‎ मठाचे मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी,‎ भाजपा शहराध्यक्ष रोहिणी‎ तडवळकर,‎ स्थायी‎ समिती सभापती रंजिता‎ चाकोते, नगरसेविका चैत्रालीताई‎ गायकवाड, सलगर वस्ती‎ पोलीस ठाण्याचे‎ पोलीस निरीक्षक श्रीशैल‎ गजा,‎ श्रीमती‎ लक्ष्मी‎ दत्तात्रय नडगिरी, महापालिकेच्या‎ आरोग्य अधिकारी‎ डॉ.‎ राखी माने, सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड आदी मान्यवर‎ उपस्थित‎ होते.‎ उपस्थितांचे स्वागत भाजपा‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ यांनी केले यावेळी‎ श्री‎ शिवपुत्र‎ आप्पाजी‎ यांनी‎ नामस्मरण, सेवाभाव‎ आणि संत‎ परंपरेचे‎ महत्त्व‎ अधोरेखित‎ करत,‎ संतांच्या चरणस्पर्शाने‎ भूमी पावन‎ होते‎ आणि समाजात प्रेम,‎ समता व‎ भक्तीची भावना‎ दृढ होते, असे‎ सांगितले.‎

 

 

 

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,‎ भाजपा‎ शहराध्यक्ष‎ रोहिणी‎ तडवळकर व‎ स्थायी समिती सभापती रंजिता‎ चाकोते‎ यांनी सामूहिक मनोगतात, इतिहासात प्रथमच श्री गजानन महाराजांची‎ पालखी‎ रामवाडीत आल्याने‎ संपूर्ण‎ परिसर धन्य‎ झाला असून वारकरी‎ संप्रदायाची‎ सेवा,‎ समता‎ आणि भक्तीची‎ परंपरा अधिक बळकट‎ होईल. महाराजांच्या‎ कृपेने‎ सर्वांच्या‎ जीवनात सुख, समाधान व‎ आध्यात्मिक उन्नती लाभो, अशी‎ प्रार्थना व्यक्त केली.‎ ईच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक‎ तथा‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ म्हणाले, श्री गजानन‎ महाराजांच्या‎ दिंडीच्या‎ इतिहासात प्रथमच‎ पालखी रामवाडीत आली,‎ हा आमच्यासाठी‎ भाग्याचा क्षण‎ आहे.‎

 

 

 

 

महाराजांच्या‎ आगमनाने संपूर्ण‎ परिसरात‎ नवचैतन्य‎ आणि भक्तिमय‎ वातावरण निर्माण‎ झाले‎ असून ही‎ सेवा‎ पुढेही‎ अखंड सुरू‎ राहील. कार्यक्रमाच्या‎ यशस्वीतेसाठी‎ राजू ब्रदर‎ जाधव, अजिंक्य‎ जाधव, कार्तिक‎ जाधव, तेजस गायकवाड, उत्कर्ष‎ गायकवाड, माणिक‎ कांबळे, वसंत कांबळे,‎ फिरोज‎ पठाण, महादेव‎ राठोड, श्रीकांत‎ गिड्डे, यल्लाप्पा शिवपुरे,‎ हुलगप्पा‎ शासम, उत्तम देडे, गोपाळ‎ जाधव,‎ पवन बेरे,‎ किरण‎ सगटे,‎ विकी सगटे यांच्यासह ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे‎ पदाधिकारी व सदस्यांनी‎ परिश्रम‎ घेतले. मोठ्या‎ भक्तिमय, मंगलमय आणि हरिनामाच्या‎ गजरात पालखी सोहळा संपन्न‎ झाला.‎

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button