india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंगचे अक्कलकोट येथे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते थाटात उदघाटन…

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

बुधवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट संचलित न्यासाच्या लगत असलेल्या जागेत अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी उद्घाटन रोजगार हमी मंत्री ना. भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते दिमाखदार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी ना. भरतशेठ गोगावले बोलत होते. या कार्यक्रमास भारतीय, रणजी, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, निवडकर्ता हे उपस्थित होते.

 

 

दरम्यान अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमी उदघाटन ना. भरतशेठ गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री, आमदार शेखर निकम, चिपळूण, आमदार, सचिन कल्याणशेट्टी, आमदार शिवाजीराव पाटील, माजी गृहराज्य मंत्री, सिद्धाराम म्हेत्रे, नगराध्यक्ष, मिलन कल्याणशेट्टी, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, संदीप फुगे, भरत मित्र मंडळ, बाळासाहेब दाभेकर, पुणे यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि चंद्रकांत पंडित, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, समीर दिघे, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, संजय पाटील, सिलेक्टर, रणजी ट्रॉफी, मुंबई व मुंबई क्रिकेट असोसिएशन, TRDO चे चेअरमन, धर्मराज गोपाल सिंग, सिंगस स्पोर्ट्स, मुंबई, अॅड. नितीन हबीब, जेष्ठ विधिज्ञ व कायदे विषयक सल्लागार, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, ओंकारेश्वर उटगे, चार्टर्ड अकाऊंटंट, अरविंद शिंदे, योगेश अहंकारी, आर्कीटेक्ट, बालाजी सलगर अजिंक्यतारा टेन्साईल रुफ,पुणे, किरण पाटील, इंजिनिअर्स व कॉट्रॅक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

 

पुढे बोलताना ना.भरतशेठ गोगावले म्हणाले, श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडणारे कार्य श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ करत आहे. गेल्या ३९ वर्षामध्ये धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. सरकार म्हणून आमदार म्हणून आपल्या प्रभावी सुरु असलेल्या कार्यासाठी आपण लागेल ती मदत करण्या कामी कटीबद्ध असल्याचे सांगून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले.

 

या वेळी त्यांनी रायगडचा इतिहास व राजकारण याबात मनोगतातून विचार व्यक्त केले. या वेळी नामदार गोगावले यांनी श्री स्वामी समर्थांच्या श्री क्षेत्र अक्कलकोट चे प्रतिनिधीत्व करणारे सचिन कल्याणशेट्टी हे खरोखरच भाग्यवान आमदार असल्याचा गौरव करून त्यांच्या कडून सुरु असलेल्या विकास कामाचे कौतक केले.

चौकट:
अॅकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूना संधी –
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अॅकॅडमीमुळे अक्कलकोट सह ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे. या माध्यमातून आय.पी.एल., महाराष्ट्र, भारतासाठी या अॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडू मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो.

समीर दिघे- भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, मुंबई

चौकट :
श्री क्षेत्र शेगाव नंतर श्री क्षेत्र अक्कलकोट येथे क्रिकेट अॅकॅडमी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाने ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना संधी देण्याचे काम न्यास करीत आहे. या पूर्वी शेगाव येथे अश्याच अॅकॅडमीचे उद्घाटन करण्याचा योग आला होता. आता श्री क्षेत्र अक्कलकोट मध्ये अॅकॅडमीचे उद्घाटन करण्याचा मान आम्हाला मिळाला आहे. पूर्वी अश्या अॅकॅडम्या ह्या मोठ्या महानगरामध्ये पाहायला मिळत होत्या, आता त्या अक्कलकोट शहरापर्यंत पोहचले आहेत. याचा फायदा तरुण खेळाडूने घ्यावेत.

संजय पाटील – सिलेक्टर व रणजी ट्रॉफी, मुंबई

समीर दिघे- भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, मुंबई व संजय पाटील – सिलेक्टर व रणजी ट्रॉफी, मुंबई यांनी
अॅकॅडमी व क्रिकेट विश्वाची माहिती यावेळी उपस्थितांना दिली.

न्यासाचे उपाध्यक्ष, अभय गुणधर खोबरे, सचिव, स्वामीराव मोरे, खजिनदार, लाला राठोड, विश्वस्त, राजेंद्र लिंबीतोटे, चंद्रकांत कापसे, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, रामचंद्रराव घाटगे, सर्व क्रियाशील सदस्य-सदस्या, सेवेकरी आणि कार्यकर्ते, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या सह चरणराज चौरे, संजय कोकाटे, आनंद तानवडे, रमेश बारसकर, पै. काकासाहेब पवार, पै. धनराज भुजबळ, महेंद्र गायकवाड, अमर पाटील, मनीष काळजे, संदीप खर्डीकर, संतोष बडवे, गिरीष कोल्हापुरे, प्रकाश सोनटक्के, राजू रंगर, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, कु. समर्थ संदीप फुगे, राजेंद्र लिंबीतोटे, ताराबाई हांडे, आरतीताई लिंगायत, रविना राठोड, लक्ष्मण पाटील, संतोष भोसले, लाला राठोड, डॉ.प्रसाद प्रधान, संदीप फुगे, अमर पाटील, रमेश बारसकर, रामचंद्रराव घाटगे, आनंद तानवडे, गणेश मोरे, मनीष काळजे, रमेश केत, योगेश गोविल, रमेश केत, धनंजय गाढवे, नागनाथ कुंभार, सिद्धाराम टाके, ओंकारेश्वर उटगे, मनोज निकम, अरविंद शिंदे, किशोर सिद्धे, अभियंता किरण पाटील, नागेश कलशेट्टी, नितीन मोरे, रोहित मोरे, प्रवीण देशमुख, नन्नु कोरबू, सिध्देश्वर माळी, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, प्रशांत साठे, अप्पा हंचाटे, अश्पाक काझी, शुभम नागरे, अभिषेक लोकापुरे, रोहित खोबरे, पुणे येथील चंदन बकरे, मयूर कडू, बाळासाहेब जाधव, दिलीप ठोंबरे, मनोज पाटील, अनिल येणकुरे, वैभव मोरे, सौरभ मोरे, संजय गोंडाळ, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, रामचंद्रराव घाटगे, गणेश भोसले, रमेश हलसंगी, संतोष माने, गोटू माने, सिद्धाराम माळी, रामचंद्र समाने, धनंजय गडदे, अभिजित लोकापुरे, सिद्धेश्वर मोरे, रोहन शिर्के, अतिश पवार, योगेश पवार, अप्पा हंचाटे, शुभम चव्हाण, केदार तोडकर, गोविंद शिंदे, योगेश कटारे, कुणाल भालेकर, पद्माकर डीग्गे, प्रशांत विभूते, शिवशरण इचगे, प्रा. प्रकाश सुरवसे, सुनिल कटारे, योगेश वाघमारे, नुर खासबागदार, राजू म्हेत्रे, पै. महेश कुलकर्णी, मौला शेख, ऋषी लोणारी, भारत पाटील, महेश दणके, आकाश सूर्यवंशी, फहीम पिरजादे, धनंजय गडदे, नारायण गडदे, रणजीत होतकर, बालाजी पाटील, सुमित कल्याणी, सागर याळवर, संजय गोंडाळ, अतिश शिंदे, श्रीशैल कुंभार, सागर शिंदे, अण्णा सावंत, रमेश केत, मैनुद्दीन कोरबु, विराज माणिकशेट्टी, दत्ता माने, दत्ता मोरे, विश्वजित पाटील, वासू कडबगांवकर, शिवा मंगरूळे, राजाराम पवार, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, विनायक भोसले, शहाजीबापू यादव, कल्याण देशमुख, चंद्रकांत हिबारे, धानप्पा उमदी, सिध्दाराम कल्याणी, मल्लिकार्जुन बिराजदार, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, एस.के.स्वामी, रमेश हेगडे, राजेंद्र पवार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, बाळासाहेब घाडगे, स्वामिनाथ बाबर, योगेश पवार, सागर शिंदे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, असद फुलारी, राहुल इंडे, मारुती बोरकर, काशिनाथ वाले, किरण साठे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण व त्यांची टीम यांच्यासह अमोलराजे लेझीम संघ व मित्र परिवार व समस्त विश्वस्त, क्रियाशील सभासद, सेवेकरी व कार्यकर्ते आदीजण मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. हे उपस्थित होते.

या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार, न्यासाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर, सुबक, कोरीव प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी पै. महेंद्र गायकवाड यांना रु. १ लाख व पै. काकासाहेब पवार यांना ५१ हजार रुपये तर. पै. धनराज भुजबळ यांना ५१ हजाराची देणगी यांना दिली. यावेळी अॅकॅडमी जवळील रहिवाश्यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. या बरोबरच वेळेच्या आत अॅकॅडमी काम अद्यावत पूर्ण केल्याबद्दल न्यासाचे सचिव शामराव मोरे यांचा सत्कार ना.भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला. या बरोबरच अॅकॅडमीचे प्रशिक्षक मल्लिकार्जुन कोळी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या अॅकॅडमीस क्रिकेटपटू- सुनिल मालप, चंद्रकांत रेंबुर्स, किशोर बोरामणी, उदय डोके, राजेंद्र गोटे, संतोषजी बडवे, अभिजित गुंड, सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

चौकट :
पोर्ट ब्लेअरपासून अक्कलकोट पर्यंत खेळाचा नवा ‘फिजिटल’ अवतार! श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.
महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचे विशेषतः क्रिकेटचे स्वरूप आता वेगाने बदलत आहे. एकेकाळी फक्त मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांपुरते मर्यादित असलेले ‘टर्फ कल्चर’ आता लातूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि अगदी अक्कलकोट सारख्या तालुका स्तरावरही पोहोचले आहे. विशेष म्हणजे, जिथे जमिनीची कमतरता आहे अशा महानगरांमध्ये आता इमारतींची छते आणि गच्चीवरील हिरव्या जाळीने व्यापल्याचे चित्र दिसत आहे.

‘पूर्वी टर्फ म्हणजे फक्त छंद होता, पण आता तो ‘हेल्थ आणि वेलनेस’चा भाग झाला आहे. लोक आपल्या फिटनेसबाबत कमालीचे सजग झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच अगदी जम्मू, नॉर्थईस्ट आणि अगदी पोर्ट ब्लेअरमध्येही टर्फ संस्कृती जोराने फोफावली आहे. कोविडनंतर निर्माण झालेली आरोग्याची जागृती आणि बदललेली जीवनशैली यामुळे ‘टर्फ’ आता केवळ खेळाचे मैदान न राहता एक समृद्ध ‘क्रीडा इकोसिस्टम’ बनले असल्याचे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्लब मेंबर बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक प्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले तर आभार अरविंद शिंदे सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button