india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

एनटीपीसी सोलापूरकडून ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन

सोलापूर, दि. २७ मार्च :

 

एनटीपीसी सोलापूरतर्फे नैगम सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत दि. २६ मार्च २०२६ रोजी आहेरवाडी, फताटेवाडी, होटगी स्टेशन आणि तिल्लेहाल या गावांदरम्यान ग्रामीण क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्यात क्रीडाभावना विकसित करणे तसेच परस्पर सहकार्य, समन्वय आणि सामाजिक ऐक्य वाढवणे हा होता.
या स्पर्धेचे उद्घाटन एनटीपीसी सोलापूरचे कार्यकारी संचालक श्री. बी. जे. सी. शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी क्रीडांचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे शारीरिक व मानसिक विकासाबरोबरच समाजात एकता आणि बंधुभाव वृद्धिंगत होतो, असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी श्री. एम. के. बेबी (मुख्य महाव्यवस्थापक – प्रचालन व अनुरक्षण), श्री. सुभाषीस बंद्योपाध्याय (महाव्यवस्थापक – अनुरक्षण व एडीएम) यांच्यासह एनटीपीसीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध गावांचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागाशी दृढ संबंध निर्माण करण्याच्या दृष्टीने ही एक स्तुत्य पहल असल्याचे सांगितले.

 

स्पर्धेदरम्यान खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह, ऊर्जा आणि उत्कृष्ट क्रीडाभावना पाहायला मिळाली. १२ षटकांच्या सामन्यात फताटेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत १०५ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आहेरवाडी संघाने दमदार खेळ करत १०६ धावा पूर्ण करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी विजेता व उपविजेता संघांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित सरपंच व ग्रामप्रतिनिधींनी एनटीपीसी सोलापूरच्या या उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले तसेच भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 

एनटीपीसी सोलापूरकडून अशा सामाजिक व सामुदायिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असून, यामुळे प्रादेशिक विकास व सामुदायिक सशक्तीकरणाबाबत संस्थेची बांधिलकी अधोरेखित होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button