Epaperindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

रांगोळीतून मोदींच्या‎ कार्याला‎ सलाम; ईच्छा‎ भगवंताची परिवाराचा‎ अनोखा‎ संदेश

तीन‎ तलाक’विरोधी कायद्याच्या माध्यमातून मुस्लिम महिलांच्या हक्कांच्या‎ संरक्षणाचा संदेश;‎ पंतप्रधान नरेंद्र‎ मोदींचा ७६वा वाढदिवस‎ गणरायाच्या चरणी महाआरतीने साजरा

 

 

सोलापूर‎ :‎

 

नवभारताच्या‎ निर्माणासाठी अखंड‎ कार्यरत असलेले‎ आणि‎ ‘राष्ट्र प्रथम’‎ हा‎ विचार‎ सर्वोच्च मानून‎ देशाच्या विकासासाठी योगदान देणारे पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी‎ यांच्या ७६व्या वाढदिवसानिमित्त‎ ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सोलापूर‎ महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील‎ श्री गणेश‎ मंदिरासमोर नरेंद्र मोदी‎ यांचे‎ आकर्षक‎ रांगोळीतील छायाचित्र‎ साकारण्यात आले.‎ या रांगोळीच्या‎ माध्यमातून ‘तीन‎ तलाक’विरोधी‎ कायदा,‎ सामाजिक न्याय‎ आणि मुस्लिम महिलांच्या‎ सन्मानाचा‎ संदेश‎ अधोरेखित‎ करण्याचा‎ प्रयत्न‎ करण्यात आला. २०१९‎ मध्ये‎ ‘तीन तलाक’विरोधी‎ कायदा अस्तित्वात‎ आल्यानंतर मुस्लिम महिलांच्या विवाहविषयक‎ अधिकारांच्या संरक्षणाच्या‎ दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल‎ पडले. याच‎ सामाजिक संदेशाला‎ रांगोळीच्या‎ माध्यमातून‎ अधोरेखित करत‎ ईच्छा भगवंताची परिवाराने मोदींच्या वाढदिवसानिमित्त आगळावेगळा‎ उपक्रम‎ राबविला. प्रारंभी श्री गणरायांच्या चरणी‎ विधिवत पूजा‎ करून दीपप्रज्वलन‎ व महाआरती‎ करण्यात आली.

 

 

‎ यावेळी उपस्थितांनी‎ पंतप्रधान‎ नरेंद्र मोदी‎ यांना वाढदिवसाच्या‎ मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.‎ भाजपा‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांनी‎ भावना‎ व्यक्त‎ करताना‎ सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी‎ हे केवळ‎ एका पदावर‎ असलेले‎ नेतृत्व‎ नसून‎ देशाच्या विकासाची‎ आणि राष्ट्रहिताची‎ नवी‎ दिशा दाखविणारे नेतृत्व आहे. ‘सबका साथ,‎ सबका‎ विकास, सबका विश्वास’‎ या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाला‎ न्याय,‎ सन्मान‎ आणि‎ समान‎ संधी मिळावी,‎ यासाठी‎ विविध निर्णय घेण्यात‎ आले. मुस्लिम महिलांच्या‎ सन्मानासाठी आणि‎ त्यांच्या‎ हक्कांच्या‎ संरक्षणासाठी‎ करण्यात‎ आलेला ‘तीन‎ तलाक’विरोधी कायदा हा सामाजिक‎ न्यायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संदेश‎ देणारा‎ निर्णय‎ असल्याचे‎ त्यांनी‎ नमूद‎ केले.

 

 

ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ रांगोळीच्या‎ माध्यमातून‎ मोदीजींचे‎ छायाचित्र‎ साकारून‎ त्यांना‎ शुभेच्छा देण्यामागे‎ केवळ वाढदिवस‎ साजरा‎ करण्याचा उद्देश‎ नाही,‎ तर‎ त्यांच्या‎ राष्ट्रकार्याला‎ आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांना‎ सलाम‎ करण्याची भावना‎ आहे. श्री गणरायांच्या‎ चरणी मोदीजींना‎ उत्तम‎ आरोग्य, दीर्घायुष्य‎ लाभावे आणि‎ भारताला‎ अधिक‎ सामर्थ्यवान, विकसित व आत्मनिर्भर बनविण्याच्या त्यांच्या कार्याला‎ यश‎ मिळावे,‎ हीच प्रार्थना, असे‎ जाधव यांनी‎ सांगितले.याप्रसंगी‎ स्थायी समिती‎ सभापती सौ.रंजिता चाकोते,नगरसेवक विनोद भोसले,पश्चिम मंडल अध्यक्ष नागेश खरात,नगरसेविका‎ सौ.अश्विनी चव्हाण,‎ सौ.चैत्रालीताई‎ शिवराज‎ गायकवाड,स्वीकृत नगरसेवक अक्षय‎ अंजीखाने,ज्ञानेश्वर‎ माऊली म्याकल,नगरसेवक‎ दायमा, नगरसेविका‎ वृषाली‎ चालुक्य,‎ नगरसेविका‎ सौ.कल्पना संतोष‎ कदम‎ सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड,युवा नेते‎ चेतन‎ नागेश अण्णा‎ गायकवाड,‎ कार्तिक किसन जाधव,माणिक‎ कांबळे, वसंत कांबळे,‎ फिरोज पठाण,महादेव राठोड, सुनील‎ कांबळे‎ व‎ परिवार तसेच‎ महापालिकेतील विविध संघटनांचे‎ कर्मचारी‎ यांच्यासह‎ ईच्छा भगवंताची‎ मित्र परिवाराचे पदाधिकारी‎ व‎ सदस्य‎ उपस्थित‎ होते.‎

 

 

 

मागील‎ वर्षीच्या कार्यकाळातील सेवा संकल्प अभियानांतर्गत‎ प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण‎ यांनी‎ दिलेल्या‎ सूचनेनुसार‎ हा‎ उपक्रम‎ राबविण्यात‎ आला. तसेच‎ पालकमंत्री जयकुमार‎ गोरे,‎ आमदार सचिन‎ कल्याणशेट्टी,‎ आमदार‎ देवेंद्र‎ कोठे,शहराध्यक्ष सौ.रोहिणीताई‎ तडवळकर तसेच‎ भारतीय‎ जनता पक्षाच्या‎ सूचनेनुसार‎ प्रथमच महापालिकेत हा‎ कार्यक्रम‎ आयोजित‎ करण्यात आला.‎ राज्याचे‎ कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री‎ देवेंद्र‎ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण‎ महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र‎ मोदी‎ यांच्या‎ वाढदिवसानिमित्त विविध‎ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button