social

समाजात विवाह जमविणारी एकमेव विश्वासात कार्यरत असणारी कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर विवाह

समाजात विवाह जमविणारी एकमेव विश्वासात कार्यरत असणारी कौस्तुभ ब्राम्हण वधू-वर विवाह हा घराघरातील जिव्हाळ्याचा विषय जेव्हा वयात येणाऱ्या मुला मुलींच्या लग्नाचा विचार येतो मनात तेव्हा एकच नांव येते ध्यानात प्रतिष्ठीत व विश्वासार्ह माध्यम म्हणजे गेली दोन दशके कै हरिभाऊ नाशिककर यांनी हि संस्था नावारूपास आणून 500 पेक्षा जास्त विवाह यशस्वी रित्या जमवून ते वधू-वर आपापल्या ठिकाणी सुखाने नांदतात. त्यांचा वारसा रविन्द्र नाशिककर यांनी तसाच पुढे चालवत 50 पेक्षा अधिक विवाह जमविली.

पण काळाची गरज ओळखून कोणत्या ना कोणत्या अडिअडचणी येवून तारुण्यात घटस्फोटाची वेळ येते. तेव्हा मनात संकल्पना आली निदान आपण त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या जिवनात जगण्याचा आशेचा सुखाचा क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न वधू वर पालकांना प्रबोधन व्हावे यासाठी विवाह समस्या : काल, आज आणि उदया ह्या विषयावर ह.भ.प श्री श्रीकांन्त आरोळे महाराज यांच्या सुरेल वाणीतून विचार समाजासमोर मांडणी करणार. यांचे औचित साधून सन २०२५ महिला रन्त पुरस्कार जुळे सोलापूर देवून यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.

यावेश्री जुळे सोलापुरातील सौ अनिता कुलकर्णी, सौ अश्वीनी कुलकर्णी, श्रीमती अनुजा कुलकर्णी, श्रीमती माधूरी तांदळे, सौ शुभदा देशपांडे, सौ श्रृती बागेवाडी, सौ सुवर्णा पेठे, सौ स्मीता देशपांडे, कु हेमा चिंचोळकर, ॲड शर्वरी रानडे, सौ नमिता थिटे, सौ शैलजा देशपांडे सौ सारीका कुलकर्णी, श्रीमती प्रिया कुंभकोणी यांचा निरपेक्ष निस्वार्थी निरंतर केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांचा यथोचित सन्मान ह . भ . प . श्री श्रीकांन्त आरोळे महाराज यांचे हस्ते प्रमुख पाहूणे सहयोग ब्राम्हण सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांन्त कुलकर्णी व ज्येष्ठ पत्रकार व क्रिडा संघटक रविन्द्र नाशिककर ब्रम्हगर्जना प्रतिष्ठान व भगवान परशुराम जयन्तीचे संस्थापक विक्रम ढोनसळे यांचे उपस्थीत मांगल्य मंगल कार्यालय भारती विद्यापीठ जवळ साईसुपर मार्केट समोर मंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठिक साडेपाच वाजता कार्यक्रम आहे.

तरी जुळे सोलापूरच्या सर्वांना या अध्यात्मिक व बहुमोल वैवाहिक जिवनावरचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त होत असून आपण सहकुटुंब सहपरिवार वरिल कार्यक्रमास उपस्थीत राहून सहकार्य करावे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून संयोजकाच्या वतिने पत्रकार रविन्द्र नाशिककर, विक्रम ढोनसळे महिला समन्वयक ॲड शर्वरी रानडे यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button